प्रतिनिधी : स्नेहा मडावी (पुणे)
पुणे : अनाथ, अपंग आणि निराधार महिलांना दिवाळी सणाच्या निमित्ताने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून सणाचा आनंद वाटण्याचा उपक्रम माणूस परिवार, महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने राबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत गहू, तांदूळ, साखर, रवा, तेल आदी साहित्याचे किट महिलांना देण्यात आले.

स्वर्गीय सुरेंद्रदादा जगताप यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला “एक करंजी दोन लाडू, अनाथ-अपंगांशी नाते जोडू” हा उपक्रम अखंड २५ वर्षे विना वर्गणी, विना देणगी, विना खंडणी या तत्त्वावर सातत्याने राबविला जात आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन माणूस परिवार संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष श्री. दुष्यंतराजे सुरेंद्रदादा जगताप, गणेश जंगम आणि सौ. स्वाती शिंदे यांनी केले.

कार्यक्रमास नगरसेवक अजय खेडेकर, सम्राट थोरात, दिलीप काळोखे, सुनील आटोळे, विश्वास मनेरे, राजेंद्र काकडे, आप्पासाहेब कुंजीर, प्रशांत गांधी, सुकेश गुंदेशा, कांता राठोड, नथमल बाफना, किरण मते, बाळासाहेब मायणे, बबलू नाईक, भवर राठोड, राजन परदेशी, प्रेमचंद जैन, समीर जिलाणी, संतोष रूपे, अमोल पोतदार, प्रकाश कोकरे, रोहन बाचल, रोहित साळुंखे, हितेश ओझा, गोरे साहेब, रामभाऊ तोडकरी, प्रज्वल निंबाळकर, समाजसेविका सुरेखाताई तुकाराम भोसले आणि गृष्म तुकाराम भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात निती निकेतन शिक्षण संस्था संचलित माऊली बालक आश्रम, वाडेबोला या संस्थेला ७०० किलो साहित्य प्रदान करण्यात आले. नगरसेवक अजय खेडेकर आणि सम्राट थोरात यांनी “माणूस परिवार” संस्थेच्या सामाजिक कार्याचे मनापासून कौतुक केले आणि संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

पत्रकार स्नेहा उत्तम मडावी यांनी अनाथ मुलांना किट आणि साहित्य देऊन आपला सहभाग नोंदवला. त्या अनेक वर्षांपासून या संस्थेसोबत निस्वार्थपणे कार्य करत आहेत.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल दुष्यंतराजे सुरेंद्रदादा जगताप आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे सर्व मान्यवरांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *